पुरंदरचा वेढा व तह


प्रश्न१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१.त्या वेळेची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे         सुरत               होती.

२.पुरंदरचा किल्लेदार               मुरारबाजी    मोठा जिद्दीचा वीर होता .

३.औरंगजेब बादशाहाची भेट घेण्यासाठी शिवराय            आग्ऱ्याला    जाण्यास तयार झाले .

४.पुरंदरच्या तहात शिवरायांनी बादशाहास   २३            किल्ले देण्याचे कबूल केले .


प्रश्न २ . योग्य जोडया लावा .

अ)मिर्झाराजे जयसिंग                    १) औरंगजेबचा बलाढ्य सेनापती   

आ)दिलेरखान                                २)औरंगजेबचा विश्वासू सेनापति

इ)मुरारबाजी                                  ३)पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार 
     
ई) शहाजीराजे                                ४)शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन



प्रश्न ३.पाठात आलेल्या नावांच्या आदयाक्षरांवरून पुढील शब्द पूर्ण करा .

 १)औ    रंगजेब 

2) पु     रंदर
             
३)मु   रारबाजी

४) ज   यसिंग

५)दि    लेरखान

प्रश्न ४ .एका वाक्यात उत्तरे लिहा .

१. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?
उत्तर - औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या ;म्हणून
बादशाहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला .

२.दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला ?
उत्तर - पुरंदरसारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बीमोड होऊ
 शकणार नाही, हे जाणून दिलेरखानानेपुरंदरला वेढा दिला .

३.मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले ?
उत्तर - मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना ;तेव्हा काही काळ  माघार घेणेच योग्य , असा विचार करूनशिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले .

४ ) पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मूलूख देण्याचे कबूल केले ?
उत्तर - पुरंदरच्या तहात शिवरायांनी २३ किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलूख
 मुघलांना देण्याचे कबूल केले .

प्रश्न ५ .दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .

१.मुरारबाजीचे शौर्य पाहून ,दिलेरखान त्याला काय म्हणाला ?
उत्तर - मुरारबाजीचे शौर्य पाहून ,दिलेरखान त्याला म्हणाला ," मुरारबाजी , तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पाहिला नाही . तू आमच्या बाजूला ये .कौल घे.बादशाहा तुला सरदार करतील जहागीर देतील.बक्षीस देतील ! "

२.मुरारबाजीने दिलेरखानास कोणते उत्तर दिले ?
उत्तर - ' बादशाहाच्या बाजूला ये,असे दिलेरखानाने सांगताच मुरारबाजीने चवताळून दिलेरखानाला उत्तर दिले "अरे , आम्ही शिवाजी महाराजांची माणसे ! तुझा कौल घेतो की काय ?आम्हांला काय कमी आहे ? तुझ्या बादशाहाची जहागीर हवी कोणाला ? "
वेब सोर्स - ई बालभारती

Post a Comment

Previous Post Next Post