१.शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्


प्रश्न १ . रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .

१ . शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो  काळ       मध्य       युगाचा होता .

२ . शिवाजी महाराजांनी    महाराष्ट्रात   स्वराज्य निर्माण केले .

3.आपल्याला  शिवाजी महाराजांची   थोर कामगिरी पाहून प्रेरणा व स्फूर्ती मिळते.

प्रश्न २ . योग्य जोड्या लावा

विजयनगरचा सम्राट - कृष्णदेवराय

मुघल सम्राट - अकबर

अहमदनगरचा सुलतान -निजामशाहा

विजापूरचा सुलतान - आदिलशाहा

प्रश्न ३ . वेगळा शब्द ओळखा

१ . स्वराज्य , गुलामगिरी , स्वातंत्र्य - गुलामगिरी

२ .रयत , प्रजा , राजा . - राजा

प्रश्न ४ .एका वाक्यात उत्तरे लिहा

१.प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा .
उत्तर - मुघल सम्राट अकबर , विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय अशा काही राजांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले .

२ . शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?
उत्तर - शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य हाती घेतले .

३. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ?
उत्तर - रयतेवर अन्याय करणाऱ्या आदिलशाही व मुघलशाही या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली .

४ . ' स्वराज्य ' म्हणजे काय ?
उत्तर -' स्वराज्य ' म्हणजे स्वतःचे राज्य .

५ .शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी कोणाच्या कामगिरीचा उपयोग
 झाला ?
उत्तर - महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संतांच्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य  स्थापनेच्या कामी उपयोग झाला .

Post a Comment

Previous Post Next Post